देशाचे सरन्यायाधीश लळीत ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये; ४ दिवसांमध्ये निघाले १८०० खटले निकाली

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय लळीत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. ते सरन्यायाधीश झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फक्त चार दिवसांत १८०० हून अधिक खटले निकाली काढले आहेत. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात सरन्यायाधीश लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या कामगिरीची माहिती दिली. ते वकीलांशी बोलताना म्हणाले की गेल्या चार दिवसात घडलेली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे.

आपण ज्या प्रकरणांची यादी करत आहोत, ते मी पदावर येण्यापूर्वीच्या प्रकरणांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. माझ्या सरचिटणीसांनी माझ्यासमोर खटल्यांचे आकडे ठेवले आहेत. गेल्या चार दिवसांत न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणांची एकूण संख्या १२९३ होती. १२९३ पैकी ४९३ प्रकरणे २९ ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून लळीत यांचा हा पहिला दिवस होता. यानंतर शुक्रवारी ३१५ निकाल सुनावण्यात आले. तर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आणि गुरुवारी १९७ आणि २२८ प्रकरणे निकाली काढली. भाषणादरम्यान न्यायमूर्ती लळीत यांनी सर्वोच्च न्यायालय नियमीत सुनावणीच्या १०६ प्रकरणांचा दोन दिवसांत निर्णय घेऊ शकते. तीन न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणीची प्रकरणे ज्यांना एकतर विस्तृत युक्तिवादाची आवश्यकता असते, किंवा सूचीबद्ध न करता अनेक दशकांपासून स्थगिती दिली जाते.

मंगळवार ते गुरुवार या काळात नियमित सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणांची यादी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली आहे. अशा ५८ प्रकरणांवर मंगळवारी निर्णय झाला, तर ४८ प्रकरणे गुरुवारी निकाली काढण्यात आली. सरन्यायाधीश लळीत म्हणाले, ‘आपण कल्पना करू शकता की न्यायालये आता नियमित खटले निकाली काढण्यावर अधिक भर देत आहेत.” न्यायालयाने सोमवारपासून ४४० याचिकाही निकाली काढल्या. मंगळवार आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात हस्तांतरण याचिकांवर निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती लळीत म्हणाले की सर्वोच्च न्यायालय शक्य तितके खटले निकाली करण्याचा प्रयत्न करेल आणि सरन्यायाधीश म्हणून ७४ दिवसांच्या आपल्या अल्प कार्यकाळात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

ते म्हणाले, ‘जेव्हा मी पदभार स्वीकारला, तेव्हा प्रत्येक डोळे मला एकच गोष्ट सांगत होते. ‘साहेब, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. ‘मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जास्तीत जास्त खटले निकाली निघावेत यासाठी सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करेल. अधिकाधिक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात पोहोचावीत आणि हा संदेश प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवावा. २७ ऑगस्ट रोजी ४९ व्या सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत, न्यायमूर्ती लळित यांनी मान्य केले की विविध स्तरांवर प्रलंबित प्रकरणे (सुमारे ७१ हजार) हाताळण्याची गरज आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

7 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

57 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

1 hour ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

1 hour ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

2 hours ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago