विरार (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अर्नाळा आगारातून सकाळी ७.४५ वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-गुहागर व ७.५० वाजताची अर्नाळा-तुळजापूर ही एसटी बंद करण्यात आली आहे. तसेच दुपारी १२.३० वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-विरार-पोलादपूर व सायंकाळी ६.३० वाजता अर्नाळा आगारात येणारी पोलादपूर-विरार-अर्नाळा या एसटीची सेवाही खंडित करण्यात आल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे.
रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्स वगळता नालासोपारा व अर्नाळा एसटी आगारातून सुटणाऱ्या एसटी बस हा एकमेव पर्याय सामान्य प्रवाशांजवळ कोकणात जाण्याकरता आहे. रेल्वेकरता प्रवाशांना दादर अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते. तर खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेदर जास्त असल्याने व ते परवडत नसल्याने सामान्य प्रवाशांची पसंती एसटीच्या बसेसला जास्त आहे. त्यातही पोलादपूर व आसपासच्या परिसरात प्रवास करण्याकरता एसटी हाच उत्तम पर्याय असल्याने अर्नाळा व नालासोपारा एसटी आगारातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे.
मात्र या आगारातून नियमित सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याने अर्नाळा आगारातून सकाळच्या वेळात कोकणात जाण्या-येण्याकरता आता एकही एसटी उपलब्ध नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झालेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कोकणी माणसाला अत्यंत प्रिय आणि त्याच्या हृदयाजवळचा हा सण आहे. या काळात एसटी महामंडळाने ही एसटी सेवा बंद करून कोकणी माणसांची निराशा केली आहे.
त्यामुळे ही एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. किंबहुना या एसटी फेऱ्यांसोबत विरार-अर्नाळा एसटी आगारातून दुपारी १ वाजता सुटून पोलादपूर येथे रात्रवस्ती करणारी बस सुरू करावी. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सूचना प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, लोकआग्रह व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही एसटी सेवा तात्काळ पूर्ववत करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात देशमुख यांनी एसटी आगार व्यवस्थापकांना पत्रही दिले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…