नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बोटीतून १७ जण प्रवास करत होते, त्यावेळी अचानक त्या बोटीमध्ये साप शिरला. सापाबद्दल समजताच होडीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे बोटीचा बॅलेन्स गेला आणि ती पाण्यात पलटी झाली. या दुर्घटनेत १७ जण बुडाले. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह हे एनडीआरएफला मिळाले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सात जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती जाहीर करण्यात आली तर त्यानंतर एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत बरी झाल्यानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आले. बुडालेल्या काही जणांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे एनडीआरएफच्या टीमकडून सांगण्यात आले.
मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बोट दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. याआधी देखील बोट बुडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…