नीरज चोप्राचा भाला बीसीसीआयने केला खरेदी; लीलावात मोजले १.५ कोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा भाला बीसीसीआयने १.५ कोटी रुपयांना लीलावात खरेदी केला आहे. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतीय खेळाडूंसाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मोदींनी पदकविजेत्यांसह सर्व खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना त्यांचे क्रीडा साहित्य ई-लिलावासाठी देण्यास सांगितले होते आणि त्यातून जमा होणारा निधी गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या नमामी गंगे या प्रकल्पात वापरण्यात येणार आहे. सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही त्याचा भाला या उपक्रमासाठी दिला होता. तो भाला बीसीसीआयने १.५ कोटी रुपयांना लिलावात खरेदी केल्याचे समजते.


नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पंतप्रधानांच्या भेटीत भाला भेट म्हणून दिला होता. २०१४ मध्ये नमामा गंगे उपक्रमाला सुरुवात झाली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१मध्ये खेळाडूंच्या क्रीडा साहित्याचे ई ऑक्शन झाले. ''बीसीसीआयने नीरज चोप्राच्या भाल्यासाठीची बोली जिंकली. यासह आम्ही अन्य काही गोष्टींवरही बोली लावली आहे. नमामी गंगे हा चांगला उपक्रम आहे आणि देशातील सर्वोच्च क्रीडा संघटना म्हणून यात हातभार लावावा, अशी आमची इच्छा होती. आम्हीही देशासाठी देणे लागतो.''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

Comments
Add Comment

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद

आशिया कप ट्रॉफीवरून रणसंग्राम: BCCI vs नक्वी, ट्रॉफीचा तिढा सुटत नाही!

नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई

IND vs AUS: कर्णधार शुभमन गिलचा मोठा डाव; 'या' धुरंधराची एंट्री निश्चित! ऑस्ट्रेलिया संघातही मोठे बदल

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ, विशेषतः अ‍ॅडलेड येथे होणाऱ्या

केशव महाराजाचा रावळपिंडीत ऐतिहासिक विक्रम! पाकिस्तानविरुद्ध ७ बळी घेऊन रचला इतिहास

रावळपिंडी: दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध सुरू

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर