विक्रमगडमध्ये बगळ्या रोगाचा शिरकाव

  99

विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासुन वरुणराजाची बरसात असल्याने व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जास्त पाउस पडला तरी नुकसान व कमी पाउस पडला तरी नुकसान त्यातच भात पिकांना कणसे भरणीचा मोसम आला असतांना तालुक्यात भातपिकांवर विविध भागात मोठया प्रमाणावर बगळया रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.


या रोगामुळे भात रोपावरील पातीतील कणसेत पळींज तयार होत आहे. त्यामुळे या रोगावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असते मात्र काहींना किटकनाशके औषध फवारणी करुनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे हया ना त्या त-हेने शेतक-यांचे नुकसान मात्र अटल आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत असुन उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


याबाबत विक्रमगड येथील शेतकरी अरुण वामन पाटील यांचे शेतावर जाउन प्रत्यक्ष पाहाणी केली असता त्यांचे जमीनीतील भात क्षेत्रावर मोठया प्रमाणावर लागवड केलेल्या भातरोपांना बगळया रोगाने पछाडले असुन त्यांनी याबाबत माहिती देतांना चिंता व्यक्त केली आहे. अनेक भागात या रोगाची लागन मोठया प्रमाणावर झाल्याचे शेतक-यांकडुन सांगण्यात येत आहे.


या रोगामुळे तालुक्यातील पिंकांवर बगळया रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज शेतक-यांकडुन वर्तविण्यात येत असुन जवळ जवळ भातपिके घटण्याचा अंदाज ओंदे येथील शेतकरी बबन पाटील यांनी सांगितले या समस्येकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवुन प्रतिबंधनात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करुन देउन भात पिकाची पाहाणी करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.

Comments
Add Comment

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील