विक्रमगडमध्ये बगळ्या रोगाचा शिरकाव

विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासुन वरुणराजाची बरसात असल्याने व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जास्त पाउस पडला तरी नुकसान व कमी पाउस पडला तरी नुकसान त्यातच भात पिकांना कणसे भरणीचा मोसम आला असतांना तालुक्यात भातपिकांवर विविध भागात मोठया प्रमाणावर बगळया रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.


या रोगामुळे भात रोपावरील पातीतील कणसेत पळींज तयार होत आहे. त्यामुळे या रोगावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे असते मात्र काहींना किटकनाशके औषध फवारणी करुनही हा रोग आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे हया ना त्या त-हेने शेतक-यांचे नुकसान मात्र अटल आहे. याचा परिणाम भात उत्पादनावर होत असुन उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


याबाबत विक्रमगड येथील शेतकरी अरुण वामन पाटील यांचे शेतावर जाउन प्रत्यक्ष पाहाणी केली असता त्यांचे जमीनीतील भात क्षेत्रावर मोठया प्रमाणावर लागवड केलेल्या भातरोपांना बगळया रोगाने पछाडले असुन त्यांनी याबाबत माहिती देतांना चिंता व्यक्त केली आहे. अनेक भागात या रोगाची लागन मोठया प्रमाणावर झाल्याचे शेतक-यांकडुन सांगण्यात येत आहे.


या रोगामुळे तालुक्यातील पिंकांवर बगळया रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज शेतक-यांकडुन वर्तविण्यात येत असुन जवळ जवळ भातपिके घटण्याचा अंदाज ओंदे येथील शेतकरी बबन पाटील यांनी सांगितले या समस्येकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवुन प्रतिबंधनात्मक औषध फवारणी व औषध उपलब्ध करुन देउन भात पिकाची पाहाणी करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार