भारत-पाकिस्तान सामना गटांमध्ये पाहिल्यास ५ हजारांचा दंड

Share

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले असून सामना पाहण्यासाठी खास नियोजनही अनेकांनी केले आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एनआयटी) विद्यार्थ्यांना गटांमध्ये भारत-पाकिस्तान आशिया कप क्रिकेट सामना पाहण्यास बंदी घातली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सामन्याशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर न ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजारचा दंड आकरण्यात आला आहे.

विद्यार्थी कल्याण विभागाच्या प्रमुखांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सामना सुरू असताना आपल्याच खोलीत राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दुबई येथे क्रिकेट मालिका सुरू आहे. विद्यार्थ्यांनी याकडे फक्त खेळ म्हणून पाहावे. क्रिकेट सामन्यावरून शैक्षणिक संस्था, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन, शिस्तभंग करू नये अशी ताकीद विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

रविवारी होणाऱ्या सामन्याच्या दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्याच खोलीत राहावे, इतर विद्यार्थ्यांच्या खोलीत प्रवेश करू नये, क्रिकेट सामना गटाने पाहू नये असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. त्याशिवाय वसतिगृहातून बाहेर काढण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Recent Posts

RR vs GT, IPL 2025: गुजरातची पात्रता फेरीकडे घोडदौड

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार…

21 minutes ago

खारदांडा स्मशानभूमी पुन्हा बंद, सहा महिन्यांपूर्वीच केली होती दुरुस्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…

60 minutes ago

बेस्ट बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये  मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…

1 hour ago

गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…

2 hours ago

मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…

2 hours ago

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…

3 hours ago