अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह नायगाव येथे सुटकेसमध्ये आढळला

  96

मुंबई : वसई जवळच्या नायगाव रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी बंद सुटकेसमध्ये अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह आढळूल आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हत्या झालेली मुलगी गुरुवारी दुपारपासून अंधेरी येथील तिच्या घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वालीव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नायगाव रेल्वे पोलिसांना फोन आला की, नव्याने बांधलेल्या पूर्व-पश्चिम पुलाजवळील झुडपात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीच्या पोटावर वार झाल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असावी असा अंदाज आहे. घटनास्थळी आढळलेल्या बॅगेत एक टॉवेल आणि काही कपडे तसेच अंधेरीतील एका शाळेचा गणवेश होता.


अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी सांगितले की, संबंधित मुलगी गुरुवारी सकाळी शाळेत जाते म्हणून अंधेरीतील घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी बेपत्ता मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.


या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, मृत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आले की, ती कोणासोबत स्वच्छेने गेली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा शोध घेण्यासाठी अंधेरी ते नायगाव स्थानकांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग स्कॅन केले जाणार आहे. याशिवाय मृत मुलीचे घर आणि शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगदेखील स्कॅन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता