झुरिच (स्वित्झर्लंड) : जगभरातील फुटबॉलची प्रशासकीय संस्था असलेल्या ‘फिफा’ने भारतीय फुटबॉल संघटनेवर (एआयएफएफ) घातलेली बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटवण्याच्या आदेश दिल्यानंतर ‘फिफा’ने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. ‘एआयएफएफ’च्या होणाऱ्या निवडणुकीवर ‘फिफा’ व ‘एएफसी’ यांची नजर राहील. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी ११ दिवसांनी उठवण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एआयएफएफ’च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने १५ ऑगस्ट रोजी बंदी घातली होती. ‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच, ‘फिफा’ने सांगितले आहे की १७ वर्षांखालील महिला विश्वचषक २०२२ आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार भारतात आयोजित केला जाऊ शकतो. ही स्पर्धा ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे होणार आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘फिफा’ने भारतीय फुटबॉल संघटनेवर (एआयएफएफ) बंदी घातली होती. फिफाच्या नियमांचे आणि घटनेचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून काढून घेण्यात आले होते. ‘फिफा’च्या निलंबनामुळे भारत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नव्हता आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नव्हता. मात्र आता बंदी उठविल्यामुळे पुन्हा एकदा सर्व मार्ग खुले झाले आहेत.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…