उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, जाधवांना पडला विसर; नितेश राणेंचा टोला

  57

मुंबई (प्रतिनिधी) : भास्कर जाधव हे काही बोलले तरी ते महत्त्वाचे नाही. कारण ते विसरले आहेत की उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. उद्धव ठाकरे असताना त्यांना भीती होती. भीती देणाराच माणूस होता. पण आताच्या सरकारमध्ये गणेशोत्सवामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांचा प्रवास चांगला व सुखकरच होईल, असा विश्वास भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यावर विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी वार्तालाप करताना आमदार नितेश राणे बोलत होते.


सालाबादप्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सव, चाकरमान्यांचा प्रवास आणि मुंबई-गोवा महामार्ग हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु या वर्षी फरक आहे. बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची ती प्रमुख जबाबदारी असल्याने त्यांनी २६ व २७ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा आयोजित केलेला आहे. त्यांनी सह्याद्रीवर या संदर्भात सर्व आमदारांची बैठकही आयोजित केली होती. त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या डागडुजीसाठी संबंधितांना २५ ऑगस्ट पूर्वी खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यासाठी जी मदत सांगेल ती द्यायला तयार असल्याचे चव्हाण यांनी संबंधितांना सांगितले होते. पाहणी दौऱ्यात मुंबई-गोवा महामार्गावर काय अडचणी आहेत, कारणे काय आहेत याचा आढावा घेतला जाईल. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचेच मोठे विघ्न होते; परंतु आता चित्र बदलले आहे. खड्ड्यांचे विघ्न दर वर्षी गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांपुढेही असायचे, पण ते विघ्न कमी करण्याचे काम या पाहणी दौऱ्यादरम्यानच्या दोन दिवसांत कमी केले जाईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.


मागील अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर विघ्न सहन करावे लागले. कोणाला बुकिंग मिळत नसायचे, कोणाला एसटी बस मिळत नसायची, रस्त्याची समस्या वेगळीच असायची, ठेकेदारांची बिले कधी वेळेवर निघाली नाहीत. वर्क ऑर्डर तयार होऊनही कंत्राटदारांना काम मिळत नसायचे. पण यंदा गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना वेगळाच अनुभव येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.


पत्रकारांनी अन्य प्रश्न विचारताच आमदार नितेश राणे यांनी त्यांना मध्येच थांबवत, कोकणवर अन्याय करू नका, रस्त्याच्या प्रश्नांवर फोकस ठेवा, असे सांगितले. आम्ही गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी मोदी एक्स्प्रेस सोडली होती. या वर्षी २९ ऑगस्टला मोदी एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. आमचे बंधू माजी खासदार निलेश राणे हेही कोकणवासीयांसाठी भाजपची एक्स्प्रेस सोडणार आहेत.चाकरमान्यांची व प्रवाशांची गणेशोत्सवासाठी जितकी सेवा भाजप कार्यकर्ते करत आहेत, तितकी सेवा अन्य कोणी करणार नाही. बस झाली, ट्रेन झाली, कोकणवासीयांसाठी आता फ्लाइट बाकी आहे. उद्या तीही सेवा दिली जाईल. कोकणासाठी सगळेच नेते एकत्र येत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण