गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पदांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. ते दीर्घकाळापासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे सांगितले जात होते.


काही दिवसांपूर्वी आझाद यांनी काश्मीरमधील पक्षाच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींना उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला.


गुलाम नबी आझाद हे पक्षावर बराच काळ नाराज होते. काँग्रेसच्या बंडखोर गटाचे महत्त्वाचे सदस्य आझाद यांनी काँग्रेसमधील बदलांबाबत सोनिया गांधींना पत्रही लिहिले होते. या पत्रानंतर बराच गदारोळ झाला होता.


आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, त्यांच्या विद्यार्थी जीवनात त्यांच्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाष चंद्र बोस आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचा प्रभाव होता. १९७५-७६ मध्ये संजय गांधींच्या विनंतीवरून त्यांनी जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता अनेक दशके पक्षाची सेवा केली.

Comments
Add Comment

भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार करारावर शिक्कामोर्तब

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी नवी दिल्ली  : भारत आणि

India-Brazil Bilateral Trade : भारत-ब्राझील द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी शनिवारी नवी दिल्लीतील हैदराबाद

Central Government : निर्यातवाढीसाठी केंद्र सरकारकडून सात उपाययोजना जाहीर

नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून एकूण सात उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

सावध व्हा! जुना Google Chrome युजर्सना हॅकिंगचा धोका ? सीईआरटी-इंडिया कडून सतर्कतेचा इशारा

भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक ( सीईआरटी-इंडिया) ने देशातील इंटरनेट

Gujarat Accident : भीषण अपघातात अहमदाबादमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

गुजरात : उत्तर गुजरातमध्ये रस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी उंझा - मेहसाणा

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने