नवी दिल्ली : भारतीय पोस्ट विभाग आपला आवाका वाढवण्यासाठी या वर्षी आणखी १० हजार टपाल कार्यालये उघडणार आहे. आम्हाला आमची घरपोच सुविधा वाढवण्यासाठी आणखी टपाल कार्यालये उघडण्याची आवश्यकता असून परवानगी मिळाली असल्याची माहिती पोस्ट विभागाचे सचिव अमन शर्मा यांनी दिली.
लोकांना त्यांच्या राहत्या घरापासून पाच किलोमीटरच्या आत बँकिंग आणि वित्तीय सेवा मिळाव्यात अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आणखी टपाल कार्यालये सुरू करत आहोत, असेही शर्मा यांनी सांगितले. ही नवी टपाल कार्यालये चालू आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२३ पर्यंत उघडली जातील. यानंतर भारतातील एकूण टपाल कार्यालयांची संख्या सुमारे १.७ लाख होईल. याशिवाय सरकारी सेवा देण्यासाठी प्रोजेक्ट आणि तंत्रज्ञानावरही विभाग काम करत आहे. अमन शर्मा यांनी माहिती दिली की तंत्रज्ञानाचा वापर करून टपाल कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने विभागाला ५,२०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
“आम्ही नुकतीच गुजरातमध्ये ड्रोनद्वारे डिलिव्हरी केली आहे. सरकारने आम्हाला २०१२ मध्ये सुरू केलेला आयटी प्रकल्प पुढे नेण्यास सांगितले आहे. टपाल आणि विविध सरकारी सेवा लवकरच घरोघरी पोहोचवल्या जातील. टपाल कार्यालयांमध्ये येण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातील,” असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…