'लोकसभा प्रवास योजनेतून' जाणून घेणार नागरिकांच्या समस्या; बिश्वेश्वर टुडू यांचा पालघर दौरा

  121

कुडूस (वर्ताहर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशभरातील विविध लोकसभा क्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून यामाध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.


सदर योजने संदर्भात माध्यमांना माहिती देताना पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, या योजनेत पालघर लोकसभा क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पालघर लोकसभाची जबाबदारी केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान पालघर लोकसभेचा प्रवास करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.


या दौऱ्यादरम्यान २४ ऑगस्ट रोजी वसई तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तर २५ ऑगस्टला सकाळी ९ वा. मनोर येथे स्वागत होऊन मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर व वारली हट या विकास कामांना भेट देऊन पुढे लोकप्रतिनिधी सोबत बैठक व विक्रमगड तालुक्यातील टेटवाली येथील बुथप्रमुख यांना भेट देणार आहेत. त्यानंतर जव्हार मधील उबंरवागंन येथे जनते सोबत संवाद तर पुढे जव्हार येथे महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले आहे.


तसेच तलासरी येथे कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. २६ ऑगस्ट रोजी डहाणू येथे समाजातील ज्येष्ठ मान्यवरांसोबत चहापान व समस्या बाबत चर्चा, पुढे बोईसर येथे व्यापारी प्रतिनिधी संवाद, पालघर येथे अमृत महोत्सव बाईक रॅली, नंतर युवामोर्चा पदाधिकारी व नवमतदार संवाद, जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी यांचे सोबत आढाव बैठक घेऊन संध्याकाळी चार वाजता पत्रकार बांधवांशी वार्तालाप करुन मंत्री टुडू दिल्लीकडे रवाना होतील, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना