मुंबईतील खड्डे बुजवा अन्यथा स्कूल बस सेवा बंद करू

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदा ही मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे १ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा अन्यथा स्कूल बस सेवा बंद करू, असा इशारा स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने दिला आहे.


सध्या मुंबईतील रस्त्यांवर केवळ खड्डेच दिसत आहेत, मात्र या खड्ड्यांमुळे स्कूल बस चालवण्याऱ्यांना देखील आता त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे स्कूल बस वेळेत पोहोचत नाही, दोन दोन तास स्कूल बसला उशीर होत आहे, तर विद्यार्थी देखील घरी अथवा शाळेत उशिरा पोहोचत आहेत, इतकेच नाही तर बसला ही तांत्रिक अडचणी येत आहेत, रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे बसच्या इंजीनमध्ये बिघाड होणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे स्कूल बस असोसिएशन कंटाळले असून याबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतला आहे.


दरम्यान स्कूल बस ऑनर्सची याबाबत बैठक झाली होती, बैठकीनंतर स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला असून १ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर १ सप्टेंबरपर्यंत जर खड्डे बुजवले गेले नाहीत, तर मात्र खड्डे असलेल्या रस्त्यांवर तात्पुरती स्कूल बस सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे, तसेच सगळ्या स्कूल बस बंद होणार नाहीत. खड्डे असलेल्या रस्त्यांबाबत हा निर्णय घेतला जाईल, मात्र याबाबत आधी विद्यार्थ्यांना पालकांसोबत चर्चा करून अथवा त्यांना माहिती देऊन बंद केल्या जातील, असे स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले आहेत.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व