मुंबईतील खड्डे बुजवा अन्यथा स्कूल बस सेवा बंद करू

Share

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यंदा ही मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे १ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवा अन्यथा स्कूल बस सेवा बंद करू, असा इशारा स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने दिला आहे.

सध्या मुंबईतील रस्त्यांवर केवळ खड्डेच दिसत आहेत, मात्र या खड्ड्यांमुळे स्कूल बस चालवण्याऱ्यांना देखील आता त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे स्कूल बस वेळेत पोहोचत नाही, दोन दोन तास स्कूल बसला उशीर होत आहे, तर विद्यार्थी देखील घरी अथवा शाळेत उशिरा पोहोचत आहेत, इतकेच नाही तर बसला ही तांत्रिक अडचणी येत आहेत, रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे बसच्या इंजीनमध्ये बिघाड होणे, टायर पंक्चर होणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे स्कूल बस असोसिएशन कंटाळले असून याबाबत त्यांनी ठोस निर्णय घेतला आहे.

दरम्यान स्कूल बस ऑनर्सची याबाबत बैठक झाली होती, बैठकीनंतर स्कूल बस ऑनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला असून १ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर १ सप्टेंबरपर्यंत जर खड्डे बुजवले गेले नाहीत, तर मात्र खड्डे असलेल्या रस्त्यांवर तात्पुरती स्कूल बस सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे, तसेच सगळ्या स्कूल बस बंद होणार नाहीत. खड्डे असलेल्या रस्त्यांबाबत हा निर्णय घेतला जाईल, मात्र याबाबत आधी विद्यार्थ्यांना पालकांसोबत चर्चा करून अथवा त्यांना माहिती देऊन बंद केल्या जातील, असे स्कूल बस ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले आहेत.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

23 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

53 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

1 hour ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 hours ago