कुस्तीत भारताची दंगल

नायरोबी (वृत्तसंस्था) : नायरोबी येथे पार पडलेल्या अंडर-२० ज्युनियर कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह १६ पदके जिंकण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे.


महिला आणि पुरुष फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारताने ७-७ पदके आपल्या नावावर केली. तर, ग्रीको रोमनमध्येही दोन पदके जिंकली. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारत पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.


जपान ९ सुवर्णांसह १५ पदके जिंकत पहिल्या स्थानी आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताचा रोहित दहिया व सुमितने कांस्यपदक जिंकले. नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या २२व्या हंगामात भारताने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकली.


पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव


दरम्यान भारतीय खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदक विजेत्या कुस्तीपटूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ट्वीट करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "भारताच्या कुस्तीपटूंमुळे पुन्हा एकदा आम्हाला अभिमानास्पद वाटत आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १६ पदके (पुरुष आणि महिला फ्रीस्टाइलमध्ये प्रत्येकी ७ आणि ग्रीको-रोमनमध्ये २) जिंकल्याबद्दल आमच्या टीमचे अभिनंदन. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे भारतीय कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याचे देखील दर्शवते.”


https://twitter.com/narendramodi/status/1561728629872132096
Comments
Add Comment

सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच