कुस्तीत भारताची दंगल

  97

नायरोबी (वृत्तसंस्था) : नायरोबी येथे पार पडलेल्या अंडर-२० ज्युनियर कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह १६ पदके जिंकण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे.


महिला आणि पुरुष फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारताने ७-७ पदके आपल्या नावावर केली. तर, ग्रीको रोमनमध्येही दोन पदके जिंकली. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारत पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.


जपान ९ सुवर्णांसह १५ पदके जिंकत पहिल्या स्थानी आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताचा रोहित दहिया व सुमितने कांस्यपदक जिंकले. नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या २२व्या हंगामात भारताने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्णपदकांसह एकूण ६१ पदके जिंकली.


पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव


दरम्यान भारतीय खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदक विजेत्या कुस्तीपटूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंसाठी ट्वीट करताना नरेंद्र मोदी म्हणाले, "भारताच्या कुस्तीपटूंमुळे पुन्हा एकदा आम्हाला अभिमानास्पद वाटत आहे. अंडर २० वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १६ पदके (पुरुष आणि महिला फ्रीस्टाइलमध्ये प्रत्येकी ७ आणि ग्रीको-रोमनमध्ये २) जिंकल्याबद्दल आमच्या टीमचे अभिनंदन. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. हे भारतीय कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याचे देखील दर्शवते.”


https://twitter.com/narendramodi/status/1561728629872132096
Comments
Add Comment

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून