Categories: रायगड

सावित्री – गांधारी पुलावर पथदिव्यांचा अभाव

Share

महाड (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २०१६ रोजी झालेल्या सावित्री पूल दुर्घटनेनंतर नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी लोकार्पणप्रसंगी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरक्षिततेच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांपासून सदरील पुलावरील पथदिवे बंद असून त्याकडे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लार्सन टुब्रो कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये नव्या गांधारी व सावित्री नदीवरील पुलावर पथदिवे आजपावेतो उभे करण्यात आलेले नाही. २ ऑगस्ट २०१६ रोजी सावित्री पूल दुर्घटनेनंतर केवळ १८० दिवसांमध्ये त्याच ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करून तो जनतेला लोकार्पण करताना रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा अपघात असल्याने यापासून बोध म्हणून नदीवरील पुलावर पथदिवे व कॅटआइज लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर संबंधित पुलांवर पहिल्या दोन वर्षांकरिता हे पथदिवे सुरू होते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून या पथदिव्यांची बिले वेळेवर भरली न गेल्याने दोन ते तीनवेळा महावितरण विभागाने येथील कनेक्शन तोडले होते. गेल्या पाच वर्षात पुलावरील पथदिव्यांच्या बाबतीत अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आगामी गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भाविकांचा वाढता राबता पाहता सदरील पुलावर पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

4 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

5 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

5 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

5 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

6 hours ago