डहाणूकरिता नवीन लोकल फेरी सुरू करा; प्रवाशांकडून रेल्वेच्या डीआरएमला निवेदन

सफाळे (वार्ताहर) : पश्चिम रेल्वेचे डीआरएम जी. सत्यप्रकाश हे एका कार्यक्रमानिमित्त डाहाणू येथे आले असता, रेल्वे प्रवाशांच्यावतीने डहाणूसाठी नवीन लोकल फेरी सुरु करावी, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. ते खासदार राजेंद्र गावित यांच्या बरोबर शनिवारी केळवे येथे दौऱ्यावर आले होते.


पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावरून संध्याकाळी ६ ते ७:१० या १ तासापेक्षा अधिकच्या वेळेत डहाणू करीता लोकल उपलब्ध नसल्याने दोन्ही लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. डहाणू विरार लोकल सेवा सुरू होऊन ९ वर्षाचा काळ उलटला तरी डहाणू विरार लोकल फेऱ्या मध्ये वाढ मात्र झाली नाही. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईकडून डहाणूकडे येणाऱ्या लोकल मध्ये १ तासापेक्षा जास्त अंतर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी विरार डहाणू लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या मध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.


त्याअनुषंगाने गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई कडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबई कडून येणाऱ्या लोकल फे-यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांच्या वतीने डीआरएम यांच्याकडे करण्यात आली. तसेच पालघर भागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून या भागातील रेल्वे समस्या सोडवण्याची मागणी डीआरयुसीसी सदस्य केदार काळे यांनी डीआरएम आणि खासदार यांच्याकडे केली.


तसेच डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकात असलेल्या विविध समस्या लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची मागणी खासदार गावित यांनी डीआरएम यांच्याकडे यावेळी केली. करोना काळात बंद करण्यात आलेली सकाळची डहाणू - विरार लोकल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डीआरएम यांनी सांगितले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजा ठाकूर, यतीन सावे आणि प्रवासी उपस्थित होते.

Comments
Add Comment

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना

एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी