Mumbai:- Gokulashtami festival on occasion Govinda celebrate Dahi Handi break on human pyramid in part Govinda's Salute National Flag and Marty's Kaustubh Rane in Mumbai on Monday September 03, 2018. Pic:- arun patil
मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून १४८ गोविंदा जखमी झाले आहेत. दहीहंडी खेळताना मुंबईत १११ गोविंदा जखमी झाले, तर ठाण्यात ३७ गोविंदा जखमी झाले. ८८ गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या. यामुळे यावर्षी कोणत्याही गंभीर जखमी किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही.
जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते. गोविंदांचा १० लाखांचा विमाही काढण्यात आला आहे.
दरम्यान, दादरमधील एक आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी होती. रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले.
दादरमधील आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे गर्दीत एक रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले. दादर पश्चिम येथील आयडियल गल्ली येथील श्री साई दत्त मित्र मंडळाने दहीहंडी आयोजित केली होती. या मित्रमंडळाच्या दहीहंडीत ही घटना घडली आहे. गोविंदा पथकाचे थर लागून उतरेपर्यंत रुग्णवाहिका एकाच जागी उभी होती. मात्र गोविंदा पथकाने आपले थर काही उतरवले नाहीत. त्याचबरोबर आयोजकांनी देखील या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. यामुळे आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…