विमान प्रवासात मास्क लावणे बंधनकारक 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. यापार्श्वभूमीवर विमान प्रवासात आता मास्क लावणे बधनकारक करण्यात आले आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएने याबाबतचे निर्देश सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.


डीजीसीएने आपल्या निर्देशांमध्ये म्हटले की, ‘विमान कंपन्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत की नाही याची खात्री करावी. तसेच या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अचानक विमानांची तपासणी देखील केली जाईल. जर या नियमांचं उल्लंघन झालेले आढळले तर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल.’


दिल्लीत १ ऑगस्टपासून १०० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सध्या दररोज ५ हून अधिक कोरोना ससंर्गबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दोन दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणंही वाढले आहे. दुसरीकडे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आणि १४ ऑगस्टपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८८२ वर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.