आरोग्य सेवेअभावी जुळ्यांचा मृत्यू

Share

मोखाडा : देशात स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव उत्साहात सुरु असताना मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. यावेळी वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने बुधर यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारची घटना घडल्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वीदेखील रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती.

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधांचा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही वानवा असल्याचे या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चांगले रस्ते आणि आरोग्य सेवा नसल्याने येथील नागरिकांना डोलीकरुन पायपीट करत दवाखाना गाठावा लागतो. त्यात वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहे.

Recent Posts

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…

9 minutes ago

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

55 minutes ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

2 hours ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

3 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

4 hours ago