Categories: पालघर

धर्मग्रंथाप्रमाणेच स्वातंत्र्याचा लढा प्रत्येकाने वाचावाच : मिल्टन सौदिया

Share

विरार (प्रतिनिधी) : ‘आपण धर्मग्रंथ आवडीने वाचतो. ही चांगली बाब आहे. काहींना धर्मग्रंथ वाचल्याशिवाय झोप लागत नाही. पण झोप उडविणारा भारताचा जाज्वल्य स्वातंत्र्य लढा प्रत्येक भारतीयाला माहित असणे आणि या लढ्याची माहिती पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे. आपण बेसावध राहिलो तर कधी आपल्या नकळत आडवळणाने देशात हुकूमशाही येईल आणि आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल ते आपल्यालाही समजणार नाही,’ अशी भीतीवजा अपेक्षा वसई मच्छिमार संस्थेचे संचालक मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी वसई मच्छिमार संस्थेच्या आवारात ध्वजवंदन झाले. ज्येष्ठ संचालक जॉनी नागो आणि नाझरेथ मनभाट यांच्या हस्ते अमृत महोत्सवी ध्वजारोहण झाले. ध्वजवंदनानंतर संचालक मिल्टन सौदिया यांनी स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास थोडक्यात सांगितला. १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांमधील स्वातंत्र्य लढ्यातील काही प्रेरणादायी घटनांचा थोडक्यात आढावा घेतला. ध्वजवंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी हेमंत जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेअरमन संजय कोळी यांनी केले.

आयटीआयचे विद्यार्थी तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर जोरदार घोषणा दिल्या. ध्वजवंदनासाठी संस्थेच्या संचालकांसह आयटीआयचे विद्यार्थी, शिक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी कोरे, त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या सभासद तथा मासळी विक्री करणाऱ्या महिला, टेम्पोचालक, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

11 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

14 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

15 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

23 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

34 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

42 minutes ago