पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; रेल्वे वाहतूक ठप्प

पुणे : पुणे-मुंबई लोहमार्गावर मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.


आज शुक्रवार असल्याने विकेंडमध्ये अनेक जण मुंबई ते पुणे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र, भल्या पहाटेच घाट परिसरात दरड कोसळ्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दरड कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.


रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज १२ ऑगस्ट रोजी लोणावळ्या नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्याने मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.


अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.


सकाळी सहा नंतर पुण्याहून निघालेल्या रेल्वे खंडाळ्याला थांबल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे कर्जतला थांबविल्या आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत