मरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवरील रोषणाईकरिता मिळाला ५० टक्के निधी

  66

मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या शनिवारपासून १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. या निमित्त मुंबईची जागतिक ओळख असलेल्या आणि राणीचा कंठहार (क्वीन्स नेकलेस) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात एकूण २८ निवासी इमारतींवर पालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वातून प्राप्त झाला आहे. पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेऊन धनादेश दात्यांनी सुपूर्द केले. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा आणि उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव हे देखील उपस्थित होते.


घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान मुंबई महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. या निमित्त मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगा स्वरुपातील विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असेल. मरीन ड्राईव्ह येथील एकूण २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर पालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन पालिकेने यापूर्वीच केले आहे.


मरीन ड्राईव्ह येथील २८ निवासी इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाईसाठी अंदाजे सुमारे ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आयनॉक्स समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ जैन, पार्कसन्स पॅकेजिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ केजरीवाल आणि ज्युपिटर डायकेमचे व्यवस्थापकीय संचालक निमेश चोखाणी यांनी आपापल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वातून प्रत्येकी ८ लाख रुपये असा एकूण २४ लाख रुपयांचा निधी धनादेश स्वरुपात पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पालिका मुख्यालयात शुक्रवारी सुपूर्द केला आहे. म्हणजेच मरीन ड्राईव्ह येथील निवासी इमारतींवरील विद्युत रोषणाईचा निम्मा खर्च या तीन कंपन्यांनी उचलला आहे.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक