बेपत्ता मुलांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची “ऑपरेशन री- युनायट” मोहीम

  79

मुंबई (वार्ताहर) : ९ वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी दोन दिवसांपूर्वी सापडल्यानंतर आता मुंबई पोलिस अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन री- युनायट” ही मोहीम राबविणार आहे. महिनाभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे.


अंधेरी येथे राहणारी मुलगी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाली त्या वेळी तिचे वय पाच वर्षे होते. बेपत्ता होऊन ९ वर्षे उलटल्यानंतर, ती कुठे आहे?, काय करते?, तिचे काय झाले असेल? याबाबत काहीही माहिती नव्हती. ती परत येईल किंवा सापडेल ही आशा तिच्या कुटुंबांनी देखील सोडली होती. मात्र डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अमलदाराच्या चिकाटीने ही मुलगी ९ वर्षांनी अंधेरीतच सापडली. या घटनेची दखल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतली आणि अनेक वर्षांपासून हरवलेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनायट” ही मोहिम प्रत्येक पोलीस ठाण्यात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान एक महिना “ऑपरेशन री- युनायट” ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील हरविलेल्या १८ वयोगटाखालील मुलामुलींचा या उपक्रमादरम्यान शोध घेण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या उपक्रमात नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. आजूबाजूला अशी कोणतीही मुलं दिसली ज्यांच्यावर बळजबरी करून विशिष्ट ठिकाणी वास्तव्य किंवा काम करत असल्याचा संशय आहे, असे कोणतेही मूल दिसल्यास १०० किंवा १०९८ वर कॉल करून कळवा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,