राज्यात कोरोनाचे १७८२ नवे रुग्ण; सात बाधितांचा मृत्यू

  79

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १७८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे तर सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात १८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


राज्यातील कोरोनाबाधितांची राज्यात आज ११,८८९ इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये ३१२७ इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये २६७२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात ११२० रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ७९,०२,४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण १.८३ टक्के इतके झाले आहे.


देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ७५१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याआधी रविवारी १८ हजार ७३८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. दुसरी चांगली बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सोमवारी दिवसभरात देशात १६ हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची घटती संख्या ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी