रत्नागिरी : रत्नागिरीत रात्रभर पडणा-या पावसाने अनेक भागांना झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले असून काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. भांडरपुळे-मालगुंड दरम्यान असणा-या भांडरपुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुक बंद करण्यात आली आहे.