हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसे उत्तर देणार

  77

मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. अमरावतीचे उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी कर्जत मध्ये प्रयत्न केले जात होते. त्याचबरोबर कर्जतमध्येही एका हिंदू युवकावर हल्ला करण्यात आल्याचा दावा नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.


नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे पण वारंवार या प्रकरणाला पुढे करत हिंदूंवर हल्ले होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आता काही महाविकास आघाडी सरकार राहिले नाही, आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक राहिले नाही, त्यामुळे लवकर हे हल्ले बंद करावे, हिंदूंना टार्गेट केलेत, तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही राणे म्हणाले.


नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, भाजप नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, अहमदनगरच्या कर्जतमध्येही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राणेंनी दिले.


आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचे नितेश राणे म्हणाले.


"आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे राज्य आहे. त्यामुळे हिंदुंवर अत्याचाराच्या किंवा हिंसेच्या घटना घडल्या तर हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, हा संदेश ज्यांना समजून घ्यायचाय त्यांनी समजून घ्यावा." असाही इशारा राणेंनी केला आहे.

Comments
Add Comment

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.

सिंहगड भागात भरदिवसा बिबट्यांचे दर्शन

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यासह सिंहगड, पानशेत भागात वारंवार बिबटे आढळण्याचे प्रकार घडत आहेत. भरदिवसा बिबट्यांचे

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाची वार्ता पोचवणारे दामूदा मोरे यांचे ९२ व्या वर्षी निधन

नागपूर : बाबासाहेब चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने