काँग्रेस आक्रमक; राष्ट्रपती भवनाला घेराव, पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या गांधी परिवाराची ईडी चौकशी सुरू आहे. या दरम्यान आज काँग्रेसने वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतरमंतर वगळता इतर सर्व ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर या आंदोलनाबद्दल काँग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत.


त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.


ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतले नॅशनल हेराल्ड कार्यालयातला यंग इंडियन कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसेने दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचे मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.

Comments
Add Comment

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,

अरे बाप रे! 'या' गावात ४० टक्के ग्रामस्थांकडे एकच किडनी

देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन नवी दिल्ली :