मुंबईत गुरुवारी पाणी कपात

मुंबई (प्रतिनिधी) : भांडुप संकुल येथील तानसा जलवाहिनीच्या कामासाठी मुंबई शहरासह उपनगरात गुरुवारी १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तर ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. मुंबई पालिकेकडून भांडुप संकुल येथील जुन्या महासंतुलन जलाशयापासून सुरू होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे, बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्लोरिन इंजेक्शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याच कालावधीत ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.


दरम्यान पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रात पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येईल. एस विभाग गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर येथे पाणी पुरवठा बंद राहील. त्यानंतर कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) येथेहीपाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. रमाबाई नगर I आणि II , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड येथे (पहाटे ५ ते सकाळी १० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Comments
Add Comment

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

मुंबईकरांच्या सेवेत १५० नवीन इलेक्ट्रिक बेस्ट बस सज्ज!२१ मार्गावर दररोज १.९ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई: मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. राज्य

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी