एका रुपयात बेस्ट प्रवाशांना सात दिवसांचा बसपास

  95

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवी वर्षात बेस्ट उपक्रमाने केवळ एका रुपयांत बेस्ट आजादी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत चलो अॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाउनलोड करता येणार आहे. त्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा समावेश असेल. ही सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.


दरम्यान बेस्टच्या डिजिटायझेशनचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली होती. सध्या बेस्टच्या ३३ लाख दैनंदिन प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो अॅपचा वापर करतात. ३.५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करतात. दरम्यान बेस्टच्या डिजिटायनेशनला चालना देण्यासाठी बेस्टने ही घोषणा केली आहे.


दरम्यान या योजनेचा भाग म्हणून ज्या लोकांना स्मार्ट कार्डस एनसीएमसी कार्डचा वापर करावयाचा असेल अशा प्रवाशांना २० रुपयांची सवलत दिली जाते. ही सवलत देखील दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकर प्रवाशांनी घ्यावा असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी

ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी