एका रुपयात बेस्ट प्रवाशांना सात दिवसांचा बसपास

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवी वर्षात बेस्ट उपक्रमाने केवळ एका रुपयांत बेस्ट आजादी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत चलो अॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाउनलोड करता येणार आहे. त्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा समावेश असेल. ही सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.


दरम्यान बेस्टच्या डिजिटायझेशनचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली होती. सध्या बेस्टच्या ३३ लाख दैनंदिन प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो अॅपचा वापर करतात. ३.५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करतात. दरम्यान बेस्टच्या डिजिटायनेशनला चालना देण्यासाठी बेस्टने ही घोषणा केली आहे.


दरम्यान या योजनेचा भाग म्हणून ज्या लोकांना स्मार्ट कार्डस एनसीएमसी कार्डचा वापर करावयाचा असेल अशा प्रवाशांना २० रुपयांची सवलत दिली जाते. ही सवलत देखील दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकर प्रवाशांनी घ्यावा असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता