अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीपासून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अंधेरी सर्कल ते पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सुरू होणार असल्यामुळे पश्चिमेकडील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.


दरम्यान पश्चिम उपनगरातील अंधेरी जंक्शन भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय ५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. तेलीगल्ली जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. २०१८ मध्ये उड्डाणपूलाच्या कामाकरिता परवानगी मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ पासून उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. तीन वर्षांनंतर आता या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


या उड्डाणपुलाची लांबी १२५ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंत उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर अंधेरी भागातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या संपणार आहे. उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे पुलाखालील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.

Comments
Add Comment

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या