अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीपासून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अंधेरी सर्कल ते पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सुरू होणार असल्यामुळे पश्चिमेकडील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.


दरम्यान पश्चिम उपनगरातील अंधेरी जंक्शन भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय ५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. तेलीगल्ली जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. २०१८ मध्ये उड्डाणपूलाच्या कामाकरिता परवानगी मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ पासून उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. तीन वर्षांनंतर आता या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


या उड्डाणपुलाची लांबी १२५ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंत उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर अंधेरी भागातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या संपणार आहे. उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे पुलाखालील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.

Comments
Add Comment

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले.

बोरिवलीत ट्रॅफिक पोलिसावर रिक्षाचालक का संतापला? गुन्हा दाखल

मुंबई : बोरिवली परिसरात वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने