अंधेरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार

  113

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीपासून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अंधेरी सर्कल ते पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सुरू होणार असल्यामुळे पश्चिमेकडील वाहतूक कोंडी सुटणार आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.


दरम्यान पश्चिम उपनगरातील अंधेरी जंक्शन भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सकाळी आणि संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय ५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. तेलीगल्ली जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. २०१८ मध्ये उड्डाणपूलाच्या कामाकरिता परवानगी मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ पासून उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. तीन वर्षांनंतर आता या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


या उड्डाणपुलाची लांबी १२५ मीटर इतकी आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आतापर्यंत उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होणार आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर अंधेरी भागातील वाहतूक कोंडीची मोठी समस्या संपणार आहे. उड्डाणपुलामुळे या मार्गावरील वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे पुलाखालील रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.

Comments
Add Comment

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा