राज ठाकरेंचे राऊतांच्या अटकेचे भाकित खरे ठरले!

मुंबई : संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तीन-चार महिन्यांपूर्वीची वक्तव्ये चर्चेत आली आहेत. या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज ठाकरेंनी केलेले भाकित खरे ठरल्याची चर्चा रंगली आहे.


काल (३१ जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून दुपारी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी रुग्णालयात तपासणीसाठी आणि दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.


दरम्यान संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या भाकितावर जोरदार चर्चा रंगली आहे.


१२ मार्च २०२२ रोजी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. 'आमचे राजकारण मिमिक्रीवर चालत नाही', असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर 'आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,' असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते.


तर १२ एप्रिल २०२२ रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, "आज पवारसाहेब संजय राऊतांवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही."


या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते की काय, अशीही चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती