बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेच्या लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. परंतु चाहत्यांना भारतीय संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. त्यामुळे अंतिम सामन्यावर क्रीडा चाहत्यांचे लक्ष्य आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव केला. या सामन्यात भारताच्या रूपा रानी, नयनमोहिनी, पिंकी आणि लवली चौबे या चौघींनी दमदार खेळ दाखवला. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. दरम्यान भारतीय लॉन बॉल्स संघावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून या खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
चार खेळाडूंचा सहभाग असलेल्या लॉन बॉल्स स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी घोडदौड कायम ठेवला होता. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीत पोहचता आले. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते. हे आव्हान भारताने सहज पेलत अंतिम फेरीचा मार्ग धरला. त्यामुळे आता भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. परंतु भारताने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा चाहते करत आहेत. सुवर्णपदक कोण उंचावणार हे अंतिम फेरीच्या सामन्यात ठरेल. त्यामुळे हा सामना क्रीडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…