Categories: ठाणे

मीरा-भाईंदरमधील सहा महिन्यांत सोळाशेहून अधिक गुन्हे उघडकीस

Share

मीरा रोड (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन दोन वर्ष होण्यास आली असून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात खून (२४), खुनाचा प्रयत्न (१८), चोरी, दरोडा (४), चैन जबरी चोरी (१७), इतर जबरी चोरी (१११), दिवसा घरफोडी (२६), रात्री घरफोडी (२२९), वाहनचोरी (४०७), बलात्कार (१६४), विनयभंग (३०२), जुगार(६८), एनडीपीस (४४५), अशा अनेक गुनह्यांचा सामावेश आहे. गेल्या सहा महिन्यात (१) जानेवारी ते ३० जून २०२२ पर्यंत अशे अनेक गुन्हे घडले असून त्याची संख्या २३७९ असून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांची संख्या जवळपास १६४७ आहे. गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जानेवारीपासून ते जूनपर्यंत दाखल गुन्ह्याच्या आकडेवारीकडे बघता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत असून हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वेळोवेळी वाढत आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार शहराची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. या शहरात सर्व देशातील विविध जाती धर्माची लोक राहत आहेत. आयुक्तालय होण्यापूर्वी गुन्हे घडत होते; परंतु ते उघडकीस येत नव्हते. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरात घडणाऱ्या गुन्ह्याची दखल घेऊन ते गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचा आकडा मोठा दिसून येतो.

पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची राज्य शासनाने या शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीच नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तांना स्वतः भेटून आपल्यावर झालेला अन्याय सांगण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याने सर्वजण आपल्यावर झालेला अन्याय आयुक्तापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत व दहशतीखाली न राहता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढे येऊन गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १६ पोलीस ठाणे येत असून या पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Recent Posts

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

1 minute ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

36 minutes ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

54 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

1 hour ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

1 hour ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

2 hours ago