मीरा रोड (वार्ताहर) : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन दोन वर्ष होण्यास आली असून पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात खून (२४), खुनाचा प्रयत्न (१८), चोरी, दरोडा (४), चैन जबरी चोरी (१७), इतर जबरी चोरी (१११), दिवसा घरफोडी (२६), रात्री घरफोडी (२२९), वाहनचोरी (४०७), बलात्कार (१६४), विनयभंग (३०२), जुगार(६८), एनडीपीस (४४५), अशा अनेक गुनह्यांचा सामावेश आहे. गेल्या सहा महिन्यात (१) जानेवारी ते ३० जून २०२२ पर्यंत अशे अनेक गुन्हे घडले असून त्याची संख्या २३७९ असून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांची संख्या जवळपास १६४७ आहे. गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जानेवारीपासून ते जूनपर्यंत दाखल गुन्ह्याच्या आकडेवारीकडे बघता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत असून हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही वेळोवेळी वाढत आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार शहराची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. या शहरात सर्व देशातील विविध जाती धर्माची लोक राहत आहेत. आयुक्तालय होण्यापूर्वी गुन्हे घडत होते; परंतु ते उघडकीस येत नव्हते. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरात घडणाऱ्या गुन्ह्याची दखल घेऊन ते गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचा आकडा मोठा दिसून येतो.
पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची राज्य शासनाने या शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठीच नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तांना स्वतः भेटून आपल्यावर झालेला अन्याय सांगण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याने सर्वजण आपल्यावर झालेला अन्याय आयुक्तापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत व दहशतीखाली न राहता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढे येऊन गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करत आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १६ पोलीस ठाणे येत असून या पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स…
तुतारी, टाळ मृदंगाचा निनाद अन् विण्याचा झंकार पिंपरी : वैष्णवांचा कैवारी आणि वारकरी संप्रदयाचे श्रध्दास्थान…
कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प मुंबई :…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला…
मुंबई : पुणे पोर्शेकार अपघात प्रकरण आज विधानसभेत गाजले. याबाबतची लक्षवेधी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत मांडण्यात…
मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक…