लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी देखील गोंधळाचे वातावरण होते. सलग दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम असल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. परंतु, त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केले.


लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. त्यानंतर आजही गोंधळ सुरुच असल्याने सभागृह सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलेले स्पष्टीकरण भाजपने फेटाळून लावले होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलेली सोनिया गांधींच्या माफीनाम्याची मागणी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली. स्मृती ईराणींनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. एकंदर सत्ताधारी आणि विरोधकांच्या मानापमान नाट्यामुळे लोकसभेच्या कामकाजाचे महत्त्वाचे तास वाया गेल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च