माथेरान मध्ये ई -रिक्षांची चाचणी शांततेत !

माथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी माथेरान मध्ये संबंधीत अधिकारी वर्गांच्या देखरेखीखाली ई- रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे उपस्थित होते. तसेच यावेळी नागरिक मोठया संख्येने ई रिक्षाच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते.


यावेळी एकूण पाच कंपन्यांच्या ई -रिक्षा चाचणी करिता दाखल झाल्या होत्या. सध्यातरी तीन महिने या रिक्षांचे परिक्षण घेवून अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर या रिक्षांमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. आम्ही या चाचणीच्या सुरक्षेसाठी आलो असून इथे ज्या ज्या ठिकाणी चढउतार आहेत त्यावरून ही रिक्षा कशाप्रकारे तग धरू शकते, याची सविस्तर माहिती वरिष्ठांना लवकरच देणार आहोत, असे आरटीओ अधिकारी चंद्रकांत माने यांनी सांगितले.


या सर्व प्रक्रियेत दहा वर्षांपासून अविरतपणे पाठपुरावा करून रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि अन्य सदस्यांच्या सोबतीने यशस्वीरित्या या ई रिक्षाच्या चाचणी पर्यंत मजल मारणाऱ्या याचिकाकर्ते सुनील शिंदेंच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. या रिक्षांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळींना घेता येणार आहे. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचीकाकर्ते सुनील शिंदे, यासह माजी लोकप्रतिनिधी, विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी, व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग