संसद परिसरात २४ निलंबित खासदारांचे धरणे

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेची मागणी करत निलंबित करण्यात आलेले २४ खासदार बुधवारी रात्री संसद भवन संकुलातील गांधी पुतळ्यासमोर धरणे धरून बसले. या खासदारांसाठी खाण्यापिण्यासह आवश्यक सुविधांची व्यवस्था विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धरणे धरणाऱ्या खासदारांच्या नाश्त्याची जबाबदारी डीएमकेने घेतली आहे. तृणमूल काँग्रेसतर्फे लंच आणि आम आदमी पार्टीतर्फे डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी द्रमुकचे खासदार तिरुची शिव यांनी धरणे देत असलेल्या खासदारांना नाश्त्यात डोसा दिला. फूड रोस्टर दही-भातापासून हलव्यापर्यंत आहे. या डिनरचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले होते.


खासदारांचे हे धरणे बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले असून ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनात काही महिला आणि वयोवृद्ध खासदार शिफ्टमध्ये सहभागी होत आहेत. खासदारांची ही निदर्शने ५० तासांचे आहे.


निलंबित खासदारांच्या हातात 'मोदी-शहा हुकूमशहा' असे फलक आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. त्यामुळेच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. गुजरातमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा मी राज्यसभेत मांडत होतो, मात्र मला निलंबित करण्यात आले, असे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले.


मंगळवारी १९ विरोधी खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ७ खासदार फक्त तृणमूल काँग्रेसचे होते. बुधवारी आपचे खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. चर्चेची मागणी करत उपसभापतींवर पेपर फेकल्याचा आरोप सर्वांवर आहे.

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड