संसद परिसरात २४ निलंबित खासदारांचे धरणे

Share

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेची मागणी करत निलंबित करण्यात आलेले २४ खासदार बुधवारी रात्री संसद भवन संकुलातील गांधी पुतळ्यासमोर धरणे धरून बसले. या खासदारांसाठी खाण्यापिण्यासह आवश्यक सुविधांची व्यवस्था विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धरणे धरणाऱ्या खासदारांच्या नाश्त्याची जबाबदारी डीएमकेने घेतली आहे. तृणमूल काँग्रेसतर्फे लंच आणि आम आदमी पार्टीतर्फे डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी द्रमुकचे खासदार तिरुची शिव यांनी धरणे देत असलेल्या खासदारांना नाश्त्यात डोसा दिला. फूड रोस्टर दही-भातापासून हलव्यापर्यंत आहे. या डिनरचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले होते.

खासदारांचे हे धरणे बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले असून ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनात काही महिला आणि वयोवृद्ध खासदार शिफ्टमध्ये सहभागी होत आहेत. खासदारांची ही निदर्शने ५० तासांचे आहे.

निलंबित खासदारांच्या हातात ‘मोदी-शहा हुकूमशहा’ असे फलक आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. त्यामुळेच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. गुजरातमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा मी राज्यसभेत मांडत होतो, मात्र मला निलंबित करण्यात आले, असे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

मंगळवारी १९ विरोधी खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ७ खासदार फक्त तृणमूल काँग्रेसचे होते. बुधवारी आपचे खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. चर्चेची मागणी करत उपसभापतींवर पेपर फेकल्याचा आरोप सर्वांवर आहे.

Recent Posts

World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…

46 minutes ago

CSK vs SRH, IPL 2025: चेन्नई व हैदराबाद आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…

53 minutes ago

महारेरा ३६९९ प्रकल्पांच्या ‘ओसीं’ची सत्यता तपासणार!

मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…

2 hours ago

Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…

2 hours ago

भारतीय वायुसेनेने सुरू केला युद्धाभ्यास

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…

2 hours ago

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

3 hours ago