नवी दिल्ली : देशातील एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत आहे, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्गही वाढतो आहे. गेल्या २४ तासांत देशात २० हजार ५५७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बुधवारी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेत अधिक आहे. आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी १८ हजार ३१३ कोरोना रुग्णांची नोंद आणि ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात बुधवारी दिवसभरात १९ हजार २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण घटले आहे. मंगळवारी दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर बुधवारी दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३२३ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४७ टक्के आहे.
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…