रत्नागिरीत गत वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घसरली

Share

रत्नागिरी (प्रतिनिधी) : दोन महिन्यांत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि ६० लघू प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागले आहेत. गडनदी मध्यम प्रकल्पात या वर्षी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडीचा या चार प्रकल्पात यंदा दुरुस्तीसाठी पाणीसाठा कमी ठेवण्यात आला आहे, तर गत वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घसरली आहे.

जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पांचा एकूण निर्मितीसाठा ४६६.४२ दशलक्ष घनमीटर इतका आहे, तर उपयुक्त साठा ४४४.१२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आतापर्यंत या तीनही धरणांमध्ये ३५१.३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गत वर्षी या तीनही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ३६९.९२ इतका पाणीसाठा २३ जुलै अखेर होता. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा २०.२५ दशलक्ष घनमीटर होता. यंदा तो १८.३८ दशलक्ष घनमीटर आहे.

गडनदी प्रकल्पात गत वर्षी उपयुक्त पाणीसाठा ६६.३८ दशलक्ष घनमीटर होता. यंदाही तेवढाच पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतका होता. शंभर टक्के साठा यंदाही आहे. नातूवाडी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यंदा ६० लघू प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याचा संचय केला आहे. त्यापैकी ४६ धरणे पूर्णपणे भरलेली आहे. गत वर्षीही यावेळी ही धरणे १०० टक्के भरली होती. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गत वर्षी याच कालावधीत २८६१ मि.मी. सरासरी नोंद झाली होती. तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही धरणांसाठी पूरक ठरला आहे.

मोठ्या नद्यांचे पाणी धरण प्रकल्पात

जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी या मुख्य नद्यांचा प्रवाह वाहतो. जगबुडी नदीचे पाणी नातूवाडी प्रकल्पात सोडले जाते. तसेच वाशिष्ठीवर फणसवाडी, शास्त्री आणि सोनवी नदीवर तेलेवाडी, काजळीवर आंजणारी, कोदवलीवर चिंचवाडी, मुचकुंदीवर मुचकुंदी आणि बावनदीच्या पाण्यावर मोर्डे धरण बांधलेले आहे.

पणदेरीच्या दुरुस्तीसाठी आराखडा बनवणार

जिल्ह्यात ६७ लघू प्रकल्प असून त्यापैकी १६ लघू प्रकल्प पाटबंधारे विभागाचे आहेत. उर्वरित पाटबंधारे विभागाचे आहेत. त्या ६७ लघू प्रकल्पांपैकी चार प्रकल्पात यंदा साठा कमी करण्यात आला आहे. त्यात तिवरे, पणदेरी, बेर्डेवाडी, कोंडवाडी यांचा समावेश आहे. पणदेरी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी आराखडा बनवण्याचे काम नाशिकच्या संस्थेला देण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

51 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago