नैनाच्या अतिक्रमण पथकाला विचुंबे ग्रामस्थांनी पिटाळले

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे नैनाचे अतिक्रमण अिधकारी चार मजली इमारत तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आले असता, त्यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. दरम्यान शेतकऱ्यांचा रोष पाहता नैनाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.


पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. २०१२ ते २०२२ पर्यंत या दहा वर्षांपासून नैनाचे भिजत घोंगडे आहे. नैना प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. गावागावांमध्ये नैनाविरोधात असंतोष पसरला आहे. तरीदेखील अद्याप तालुक्यातील गावांवर नैनाची टांगती तलवार आहे. २६ जुलै रोजी नैनाचे अतिक्रमण विभाग विचुंबे येथे तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.


ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच ही इमारत उभी केलेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून नैनाने पनवेल तालुक्याचा कोणता विकास केला? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. यावर नैनाचे अधिकारी निरुत्तर झाले. चार मजली इमारत पाडण्यासाठी नैनाचे अधिकारी जेसीबी व पोकलेनसह आले होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.


या वेळी समितीचे अध्यक्ष वामन शेळके, नामदेव फडके, राज पाटील, डिके भोपी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, बाळा फडके, गजानन पाटील, बबन फडके, किशोर सुरते, नीलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनिल ढवळे, सुधाकर लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Comments
Add Comment

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय

पनवेल पालिका भाजप निवडणूक प्रभारीपदी रामशेठ ठाकूर

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी माजी खासदार

रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार? अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते;

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

जिल्ह्यासाठी २८८ कोटींचा विकासनिधी

आराखड्यापैकी ६० टक्के निधी मिळाला, ५० टक्क्यांचे वितरण अलिबाग : राज्य सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. मात्र

ब्रेक फेल झाल्यामुळे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रकचा झाला चेंदामेदा

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी मोठा अपघात झाला. सिमेंट ब्लॉक घेऊन जात असलेला ट्रक थेट रस्त्याच्या