नैनाच्या अतिक्रमण पथकाला विचुंबे ग्रामस्थांनी पिटाळले

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे नैनाचे अतिक्रमण अिधकारी चार मजली इमारत तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आले असता, त्यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. दरम्यान शेतकऱ्यांचा रोष पाहता नैनाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.


पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. २०१२ ते २०२२ पर्यंत या दहा वर्षांपासून नैनाचे भिजत घोंगडे आहे. नैना प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. गावागावांमध्ये नैनाविरोधात असंतोष पसरला आहे. तरीदेखील अद्याप तालुक्यातील गावांवर नैनाची टांगती तलवार आहे. २६ जुलै रोजी नैनाचे अतिक्रमण विभाग विचुंबे येथे तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.


ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच ही इमारत उभी केलेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून नैनाने पनवेल तालुक्याचा कोणता विकास केला? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. यावर नैनाचे अधिकारी निरुत्तर झाले. चार मजली इमारत पाडण्यासाठी नैनाचे अधिकारी जेसीबी व पोकलेनसह आले होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.


या वेळी समितीचे अध्यक्ष वामन शेळके, नामदेव फडके, राज पाटील, डिके भोपी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, बाळा फडके, गजानन पाटील, बबन फडके, किशोर सुरते, नीलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनिल ढवळे, सुधाकर लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग