नैनाच्या अतिक्रमण पथकाला विचुंबे ग्रामस्थांनी पिटाळले

नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे नैनाचे अतिक्रमण अिधकारी चार मजली इमारत तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह आले असता, त्यांना शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. दरम्यान शेतकऱ्यांचा रोष पाहता नैनाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.


पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. २०१२ ते २०२२ पर्यंत या दहा वर्षांपासून नैनाचे भिजत घोंगडे आहे. नैना प्रकल्पाला येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. गावागावांमध्ये नैनाविरोधात असंतोष पसरला आहे. तरीदेखील अद्याप तालुक्यातील गावांवर नैनाची टांगती तलवार आहे. २६ जुलै रोजी नैनाचे अतिक्रमण विभाग विचुंबे येथे तोडक कारवाई करण्यासाठी आले होते. याची माहिती नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.


ग्रामपंचायतची परवानगी घेऊनच ही इमारत उभी केलेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून नैनाने पनवेल तालुक्याचा कोणता विकास केला? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. यावर नैनाचे अधिकारी निरुत्तर झाले. चार मजली इमारत पाडण्यासाठी नैनाचे अधिकारी जेसीबी व पोकलेनसह आले होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.


या वेळी समितीचे अध्यक्ष वामन शेळके, नामदेव फडके, राज पाटील, डिके भोपी, शेखर शेळके, वासुदेव भिंगारकर, बाळा फडके, गजानन पाटील, बबन फडके, किशोर सुरते, नीलेश वाघमारे, वामन वाघमारे, अनिल ढवळे, सुधाकर लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.