कोलकाता : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा फायदा घेत भाजपाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. आता भाजपाच्या निशाण्यावर बंगाल असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिथुन चक्रवर्ती गतवर्षीच भाजपामध्ये दाखल झाले होते. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामधील २१ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपा दंगे करतो असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, असे आरोप करणे हा केवळ एका कारस्थानाचा भाग आहे.
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…