मुरबाड (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २६३ गावे पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५७ व शहापूर तालुक्यातील ९२ गावांचा तर पालघर जिल्ह्यातील वाडा ६२, मोखाडा २१ व जव्हार तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रात या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या गावात रेती उत्खनन, दगड खाणी, वीट भट्टयांवर निर्बंध लागू होणार आहेत तसेच विशिष्ट प्रकारचे उद्योग उभरण्यावरसुद्धा निर्बंध येणार आहेत.
यापूर्वी २०१९ साली भीमाशंकर ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाला होता. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील १५ गावांचा समावेश होता. आता पश्चिमघाट ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्याने ही संख्या वाढली आहे. लवकरच कळसूबाई हरिश्चंद्रगड ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होणार आहे. त्यामध्ये माळशेज घाट परिसरातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते.
उत्तरेला तापी नदी ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यात हा पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५७ गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
यापूर्वी भीमाशंकर अभयारण्य क्षेत्राजवळ असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील पंधरा गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे, जांभूर्डे, खानिवरे, साकुर्ली, नारीवली, उचले, देहरी, खोपीवली, मिल्हे, दुधनोली, उमरोळी खुर्द, दुर्गापूर, मढ, रामपूर व पळू या १५ गावातील ग्रामस्थांवर बंधने आली आहेत.
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…