ठाणे व पालघर जिल्ह्यातील २६२ गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर!

मुरबाड (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २६३ गावे पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील ५७ व शहापूर तालुक्यातील ९२ गावांचा तर पालघर जिल्ह्यातील वाडा ६२, मोखाडा २१ व जव्हार तालुक्यातील ३० गावांचा समावेश आहे.


पर्यावरण मंत्रालय भारत सरकारतर्फे ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या विशेष राजपत्रात या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेल्या या गावात रेती उत्खनन, दगड खाणी, वीट भट्टयांवर निर्बंध लागू होणार आहेत तसेच विशिष्ट प्रकारचे उद्योग उभरण्यावरसुद्धा निर्बंध येणार आहेत.


यापूर्वी २०१९ साली भीमाशंकर ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाला होता. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील १५ गावांचा समावेश होता. आता पश्चिमघाट ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्याने ही संख्या वाढली आहे. लवकरच कळसूबाई हरिश्चंद्रगड ईको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होणार आहे. त्यामध्ये माळशेज घाट परिसरातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे समजते.


उत्तरेला तापी नदी ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यात हा पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५७ गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.


यापूर्वी भीमाशंकर अभयारण्य क्षेत्राजवळ असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील पंधरा गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे, जांभूर्डे, खानिवरे, साकुर्ली, नारीवली, उचले, देहरी, खोपीवली, मिल्हे, दुधनोली, उमरोळी खुर्द, दुर्गापूर, मढ, रामपूर व पळू या १५ गावातील ग्रामस्थांवर बंधने आली आहेत.

Comments
Add Comment

ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

ठाकुर्लीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू्न कारवाई डोंबिवली  : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली, कचोरे गाव हद्दीतील

हत्या केली मात्र अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी केला चक्क सापाचा वापर; कशी केली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याची हत्या?

बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा

स्मार्ट सिटीतील प्रकल्प रखडला, कल्याणकरांची प्रतीक्षा वाढली; उड्डाणपूल कधी खुला होणार?

कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील