सोनिया गांधीची ६ तास ईडी चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावले

नवी दिल्ली (हिं.स.) : नॅशन हेराल्डशी संबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 6 तास चौकशी केली. त्यांच्या चौकशीची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान ईडीने त्यांना उद्या, बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.


नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने सोनिया गांधींची दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली. सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवरील विद्युत लेनमध्ये असलेल्या ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचल्या. यानंतर ईडी कार्यालयातून दुपारच्या जेवणासाठी निघाल्या. तसेच दुपारी ३.३० वाजता परत आल्या. याप्रकरणी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची पहिल्यांदा दोन तास चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ५० तासांहून अधिक चौकशी झाली आहे.


दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्या चौकशी सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. काँग्रेसने ईडीच्या कारवाईला राजकीय द्वेषाचे कृत्य म्हटले आहे. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी आज संसद भवनापासून मोर्चा काढला. हे सर्वजण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवले. यानंतर या नेत्यांनी तेथे धरणे दिले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत