शिवसेनेच्या निवडणूक आयोगाविरोधातल्या याचिकेवर १ ऑगस्टला सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.


न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.


शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या लढ्यादरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले आहे.


निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. अशावेळी निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात शिंदे गट खोटे बहुमत दाखवत संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू

Digital Fraud News : ८ कोटींची फसवणूक, १२ पानांची चिठ्ठी अन् स्वतःवर गोळी; माजी IPS अमर सिंग चहल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पटियाला : पंजाबमधील एक धक्कादायक घटना समोर आली असून, राज्याचे माजी आयपीएस (IPS) अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवर

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी

प्रदूषण प्रमाणपत्र नाही, तर पेट्रोल नाही…

राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश ओडिसा : भारतातील वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून ओडिशा सरकारने महत्वाचा

अरावली पर्वतरांगेतील ९० टक्के क्षेत्र संरक्षित

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : राजस्थानमधील अरावली