प्रहार    

ठाण्यात ‘स्वाईन फ्ल्यू’ने वाढवली चिंता; जुलैमध्ये तिघांचा मृत्यू

  96

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूने वाढवली चिंता; जुलैमध्ये तिघांचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना ‘स्वाईन फ्ल्यू’ने ठाण्यात डोके वर काढल्याचे चित्र आहे. ठाण्यात जुलै महिन्यात २० स्वाईनचे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत त्यापैकी दोन महिलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ठाणे शहरात रहाणाऱ्या एका ६० वर्षाच्या इसमाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात रहाणारे ६० वर्षाचे नागरिक शनिवारी सकाळी स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने संध्याकाळी त्यांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, त्यांना मुंबईला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ठाण्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान, स्वाईन फ्लूने रुग्ण दगावल्याने शहारत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे ११ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईनंतर आता ठाणेकरांचीही चिंता वाढली आहे.


ठाण्यात एकट्या जुलै महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळून आले असून, यातील १५ जण उपचार घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे; तर ३ रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी २ रुग्ण हे ठाणे हेल्थ केअरमध्ये उपचार घेत असून, एक रुग्ण ज्युपिटर रुग्णालयात दाखल आहे. स्वाईनने मृत झालेल्या दोनपैकी एक महिला ७१ वर्षे, तर दुसऱ्या महिलेचे वय ५१ आहे. यातील पहिली महिला शहरातील जितो रुग्णालयात १४ जुलैला उपचारासाठी दाखल झाली होती. १९ जुलैला त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला; तर दुसरी महिला १४ जुलैला ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, त्यांचा १८ जुलैला मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल २० रुग्ण आढळले आहेत. शहरात सर्व्हे करण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सूरु केले आहे.ठाण्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात औषध फवारणी व उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


डेंग्यू , मलेरियाही फोफावतोय...


ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूसोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले असून, डेंग्यूचे ८ तर मलेरियाचे १४ रुग्ण आढळले आहेत. पालिका प्रशासनाने आतापर्यंत ६०० नागरिकांच्या घरात जाऊन ताप आणि स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणे आढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, डॉक्टरचा जागीच मृत्यू!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका दुःखद अपघातात ३२ वर्षीय डॉक्टर प्रियांका अहिर यांचा मृत्यू झाला. ही

मुंबई गणेशोत्सवासाठी सज्ज, चौपाटीवर विसर्जनाची तयारी!

मुंबई : गणेश चतुर्थीच्या आगमनामुळे मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली आहे, विशेषतः गिरगाव चौपाटीवर, जे विसर्जनाचे एक

सोनू निगमच्या आवाजातले 'बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

Marathi Movie Song Released: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

वीव्हर सर्व्हिसेसने कॅपिटल इंडिया होम लोन्सचे २६७ कोटीत अधिग्रहण पूर्ण केले

मुंबई: सर्व आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर वीव्हर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Weaver Servics Private Limited) ने कॅपिटल