खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

  86

खेड (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील नारिंगी, चोरद व जगबुडी नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली. यापैकी जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडून वाहत होते.


पावसाने ४ दिवस विश्रांती घेतली होती. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र रविवारी सकाळपासून संततधार लागल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रविवार असल्याने येथील बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, ४ दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने शेतकरी वर्ग लावणीची कामे पूर्ण करण्याच्या बेतात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.