खेड (प्रतिनिधी) : गेल्या चार दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून मुसळधार बरसण्यास सुरुवात केल्याने तालुक्यातील नारिंगी, चोरद व जगबुडी नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली. यापैकी जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडून वाहत होते.
पावसाने ४ दिवस विश्रांती घेतली होती. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र रविवारी सकाळपासून संततधार लागल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. रविवार असल्याने येथील बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, ४ दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने शेतकरी वर्ग लावणीची कामे पूर्ण करण्याच्या बेतात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…