रत्नागिरीत परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे

रत्नागिरी (हिं.स.) : दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.


या दरडींमुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येते. चौपदरीकरणामुळे या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ७ जुलैला सुनावणी झाली. न्यायालयाच्या सूचनेनुसार आता घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.


कल्याण टोलवेज कंपनीकडून घाटातील वरच्या बाजूस चार ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच ठिकाणी शेडमध्ये त्याचे नियंत्रण युनिट बसवण्यात आले आहे. तेथे २४ तास कर्मचारी लक्ष ठेवत आहे. ईगल इन्फ्राकडून २ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची

रत्नागिरी जिल्ह्यात मर्सिडीज बेंझ जळून खाक

रत्नागिरी : खेड तालुक्यातील नातूनगर येथे मर्सिडीज बेंझ कारला आग लागली. सोमवारी मध्यरात्री २.५० च्या सुमारास ही

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा