सलमान खाननंतर आता कतरिना आणि विकीला जीवे मारण्याची धमकी

  53

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून धमकीचे सत्र सुरू झाले आहे. सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा अभिनेता पती विकी कौशल या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे काही दिवसांपूर्वीच लग्नबेडीत अडकले. सुखी संसाराला सुरुवात झाल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणीतरी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारानंतर विकी कौशलने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. विकी कौशलच्या तक्रारीवरून सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना धमकी कुणी दिली, याचा तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानला धमकी देण्यात आली होती. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. ५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. 'सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू', अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल