नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

ओरेगॉन : भारताचा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेत पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने ९०.५४ मीटर भाला फेकला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने ८८.०९ मीटर भालाफेक करत कांस्य पदक पटकावले.


नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्य पदकाला गवसणी घातली. तब्बल १९ वर्षानंतर भारताने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक मिळवले आहे. यापूर्वी लांब उडीज अंजू बॉबी जॉर्जने पदक जिंकले होते. याचबरोबर नीरज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे.


नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीची सुरूवात केली. मात्र त्याने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. दुसरीकडे सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आणि गतविजेता अँडरसन पेटर्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ९०.२१ मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने ८२.३९ मीटर भाला फेकला. तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.


मात्र ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. पाचव्या स्थानावर घसरलेल्या नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि