'इंद्रायणी एक्स्प्रेस' २५ दिवसांसाठी रद्द

  128

सोलापूर (हिं.स.) : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने सोमवार (१८ जुलै) रोजी सुरु केली. प्रवाशांनी इंद्रायणी एक्स्प्रेसचे गाजत-वाजत सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. मागील पाच दिवसानंतर लगेचच भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सोमवार २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे.


यादरम्यान सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून, याचा सर्वाधिक फटका इंद्रायणी एक्स्प्रेसने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सोलापूरकरांना बसणार आहे. सोलापूर विभागात दौंड-कुर्डूवाडी विभागात भिगवण-वाशिंबे या २६ किलोमीटरच्या मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे. हे काम सोमवर २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून, यात एकूण दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.


सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, अवघ्या पाच दिवसात गाडी पुन्हा रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोकरदार, शिक्षण, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी यांनी आधीच तिकीट आरक्षीत करुन ठेवलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला