'इंद्रायणी एक्स्प्रेस' २५ दिवसांसाठी रद्द

सोलापूर (हिं.स.) : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने सोमवार (१८ जुलै) रोजी सुरु केली. प्रवाशांनी इंद्रायणी एक्स्प्रेसचे गाजत-वाजत सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. मागील पाच दिवसानंतर लगेचच भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सोमवार २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे.


यादरम्यान सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून, याचा सर्वाधिक फटका इंद्रायणी एक्स्प्रेसने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सोलापूरकरांना बसणार आहे. सोलापूर विभागात दौंड-कुर्डूवाडी विभागात भिगवण-वाशिंबे या २६ किलोमीटरच्या मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे. हे काम सोमवर २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून, यात एकूण दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.


सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, अवघ्या पाच दिवसात गाडी पुन्हा रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोकरदार, शिक्षण, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी यांनी आधीच तिकीट आरक्षीत करुन ठेवलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत