शिंदेंना झेड सुरक्षा दिली होती; वळसे पाटलांनी सर्व आरोप फेटाळले

मुंबई : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात येणारे आरोप खोटे असल्याचे वळसे पाटलांनी म्हटले आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असेही वळसे पाटलांनी म्हटले आहे.


शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, दादा भुसे आणि दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरीटी नाकारली होती, असा आरोप भुसे, कांदे आणि केसरकर यांनी केला. यावरून आता राजकारण तापले आहे.


एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्या काळात अनेक नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई झाली होती. त्यात अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना झेड सुरक्षा देण्याचे टाळले होते, असेही शिंदे गटाने म्हटले होते. त्यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


दरम्यान, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने अनेक कामांना दिलेल्या मंजुरींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा प्रकारचा निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे वळसे पाटील म्हणाले. असे करून राजकारण होईल. मात्र, यामुळे याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर होईल. त्यामुळे राजकारणासाठी कामांवर स्थगितीचा निर्णय घेणे उचित नाही, असे ते म्हणाले.


राज्यातील काही प्रकरणांचा तपास राज्य पोलिसांकडून काढून सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला असून, त्याचा तपास कुणीही करावा मात्र, तो योग्य पद्धतीने व्हावा हीच अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

राज्यातील २४ नगर परिषदांमध्ये आज मतदान

उद्या मतमोजणी मुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगर परिषदांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या

Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

विश्वविजेत्या दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी

मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"ऋषभायन-2" वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते